उस्मानाबाद :- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे आयोजित जिल्हा स्तरीय लोकनृत्य स्पर्धेत जि.प.प्रशाला बेंबळीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गोंधळी गीताला द्वितीय क्रमांक मिळाला असून या संघाची पुणे येथे दिनांक ६ व ७ ऑक्टोबर रोजी होणार्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या संघातील विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका जे.जे. राऊत यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मोमीन अस्मा व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब पठाण यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक सहकार्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या संघात ऋषीकेश माने, कोतवाल बिलाल, ओंकार शिंदे, नोहिद जमादार, बिलाल शेख, समीर शेख, करण विधाते व ज्ञानेश्वर कसबे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.