उस्मानाबाद -: आपल्या संपूर्ण आयुष्यातील आचरणातून आणि विचारांमधून जगाला शांतता, मानवतावाद, सहिष्णुता, बंधुभाव यांचा संदेश दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 
       यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी  उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार सुभाष काकडे, तहसीलदार शिवकुमार स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह कार्यालयातील अधिकारी -कर्मचा-यांची उपस्थिती होती.
 
Top