
नुकतेच जल शुद्धीकरण प्रकल्पाचे विविध मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.त्यामुळे आता पांगरी येथील जिल्हा परिषद प्रशाळेतील कच्या,बच्या गरीब विद्यार्थानाही शाळेत शुद्ध केलेले पाणी पिण्यास मिळणार असून यामुळे उद्भवणार्या अनेक समस्या संपूष्ठात येणार आहेत. पांगरी येथे जिल्हा परिषदेची मुलांची,मुलींची व उर्दू माध्यमाची अश्या तिन शाळा एकाच ठिकाणी आहेत.मात्र येथील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत होता.यामुळे प्रारंभी शिक्षकांच्या वर्गणीतून शाळेत कूपनलिका घेण्यात आली.मात्र तेही पाणी अशुद्ध व क्षार युक्त असल्याचा अहवाल आल्यामुळे त्यांनी ग्रामस्थांपुढे आर.ओ.शुद्ध पाण्याच्या उपक्रमाविषयी बोलुन सहकार्याचे आवाहन केले.त्यानुसार ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोला करत शिक्षकांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी केला.
यावेळी पोलिस ठाण्याचे सं.पो.नि.सोमनाथ वाघ,केंद्र प्रमुख श्रीहरी गायकवाड,विकास राऊत,अंकुश लाडे,माजी सरपंच दत्ता काकडे,शीतल जानराव,स्वप्नील काळे,अतुल देशमुख,सुनील गाढवे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास गोडसे,बाबा जाधव,अनिल गरड,राजाभाऊ पाटील,बापू काळे,किशोर बगाडे,कैमुद्दीन काजी,अजित वासकर,मुख्याध्यापक लक्ष्मण काशीद,जनाब खान आदि उपस्थित होते॰