उस्‍मानाबाद - जिल्ह्यातील चारा छावण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे कोट्यावधीचा निधी पडून असताना जिल्हाधिका-याच्या अडमुठ्या धोरणामुळे ही बिले अदा केली जात नाहीत. त्यामुळे आहे त्या चारा छावण्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी य गांभीर्याने दखल घेवून पशुधन वाचविण्यासाठी निधीचे वितरण त्वरीत करण्‍याची मागणी  शिवसेनेच्‍यावतीने करण्‍यात आली आहे     
   दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील पशुधन वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात एवूâण ७ चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या असून त्यामध्ये जवळपास साडेसहा हजार जनावरांचे संगोपण केले जाते. चारा छावणीच्या बीलासाठी जिल्हा प्रशासनाकडे कोट्यावधीचा निधी पडून असल्‍याचे नमुद करून  आडमुठ्या धोरणामुळे छावणीचे बीले देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. 
 जिल्हाधिका-यांनी याची गांभीर्याने दखल घेवून नविन चारा छावण्याच्या प्रस्तावास त्वरीत मान्यता देण्यात यावीत. तसेच मंजूर चारा छावण्याच्या बीलाची अदाई त्वरीत करुन मुक्या जनावरांचे हाल थांबवावेत अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिका-यांना  निवेदनादवारे करण्यात आली आहे. या निवेदनाची जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्यास चारा छावणीतील सर्व जनावरे पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोडण्यात येतील असा सणसणीत इशाराही या निवेदनात  देण्यात आला आहे.
    जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली  वाहतुक सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी पवार, शिवसेना उस्‍मानाबाद तालुकाप्रमुख दिलीप जावळे, माजी तालुकाप्रमुख रामेश्वर शेटे, शहरप्रमुख पप्पु मुंडे, पांडू भोसले, खालेद शेख, बाळासाहेब देशमुख, भारत सांगवे, विनोद निंबाळकर, विजय काकडे, भगतसिंह गरीरवार, जयराम चव्हाण, महादेव गवाड, सुशांत पाटील, अंकुश मोरे, उत्तम कांबळे, अनिल कदम, अरविंद पवार, दादा शेलार, शिवरत्न तौर आदीसह शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते.

 
Top