पांगरी (गणेश गोडसे) :- गत चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी तर पांगरीसह परिसरात समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे बार्शी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी पुर्णतः अडचणीत आला आहे.गतवर्षी किमान घाटमाथ्यावर पडलेले पावसाचे पाणी पांगरी परिसरातील साठवण तलावात आल्यामुळे साठवण तलावात अंशतः का होर्इना पाणी साठा झाला होता. आपल्या मागचा दुष्काळ पुढच्या वर्षी तरी संपेल या भोळया आशेवर गेल्या वर्षी तालुक्यात मोठया प्रमाणात लागवड झाली होती.मात्र चालु वर्षीही पुन्हा ऊस उत्पादक शेतक.यांच्या नशिबी दुष्काळाच आल्यामुळे हा शेतकरी पुरता निराश झाल्याचे दिसत आहे.सलग अणेक वर्षे दुष्काळाचे चटके भोगलेल्या शेतक.यांनी यावर्षीतरी भरघोष ऊत्पन्न मिळेल अशी अपेक्षा धरली होती.मात्र त्यांच्या आशेवर विरजण पडले आहे.
1972 पेक्षाही दुष्काळाची जास्त दाहकता पांगरी भागातील ऊस ऊत्पादक शेतक-यांना अनुभवावी लागणार असल्याचे संकेत आहेत.अगोदरच सलग तिन वर्षांतील भिषण पाणीटंचार्इने अक्षरक्षः कंबरडे मोडलेले होते.सध्या मात्र तालुक्यातील कांही अंशीच उस उत्पादक शेतक.याचा ऊस शिल्लक राहीलेला आहे.
ऊस लागवडीवर साखर कारखान्यांचे भवितव्यः
सध्या बार्शी तालुक्यातील बहुतांश साठवण तलाव कोरडे ठणठणित पडलेले आहेत.समाधानकारक पाणी साठा नसल्यामुळे नव्याने उस लागवड मोठया प्रमाणावर होन्याची शक्यता नाही. बार्शी तालुक्यात सध्या दोन खाजगी साखर कारखाने कार्यरत आहेत.सध्या मात्र एकही कारखाना सुरू नसल्यामुळे खाजगी साखर कारखान्याचा यावर्षीचा गळित हंगाम होणार का नाही यबाबत शांसकता आहे.यावर्षी साखर कारखान्यांना गळीत हंगामास पुरेल येवढा ऊस शिल्लक नसल्यामुळे अणेक साखर कारखान्यांना आपला गळीताचा हंगाम लवकरच आटोपता घ्यावा लागणार आहे.गतवर्षी शेजारील उस्मानाबाद जिल्हयातील सर्वच साखर कारखाने उसाच्या व पाण्याच्या उपलब्धतेअभावी जवळपास बंद ठेवन्यात आले होते.त्यामुळे त्याचा लाभ शेजारील तालुक्यांना होऊन समाधानकारक उस येथील कारखान्यांना उपलब्ध झाला होता.त्यामुळे कारखाने पुर्ण क्षमतेने चालले होते.मात्र शासनाच्या परवानगीने सुरू होणा.या अणेक साखर कारखान्यांना यावर्षी उसाच्या उपलब्धतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूणच कारखान्याचे गळित हंगाम यश्यस्वी करावे लागणार आहेत.
पाण्याचा काटेकोर वापर गरजेचा :
साठवण तलाव पुर्ण क्षमतेने भरले की शेतकरीही उपलब्ध पाण्याचा नियोजनबदध व गरजेनुसार वापर करन्याकडे दुर्लक्ष करूण पाण्याचा अतिरीक्त वापर करण्यावर जास्त भर दिला जातो.मात्र त्यामधुन पाण्याचा अपव्यय होऊन पाण्याची मोठया प्रमाणात नासाडी होते.शासनाने ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचे करन्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची काटेकोर अंमलबजावनी होणे गरजेचे आहे.तसे झाले तरच पाण्याचा सदुपयोग होर्इल.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णय अंमलबजावणीकडे डोळे :
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ठिबकचे दर निम्यावर आणण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे ऊस उत्पादक शेतक.यांचे डोळे मुख्यमंत्रयांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे लागुण राहिलेले आहेत.ठिबक सिंचनचे दर निम्यांवर आल्यास शेतीच्या पाण्याची मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.