उस्मानाबाद -: श्रीदिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत वार्षिक रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री १००८ कुलभूषण-देशमभूषण यांच्या पदस्पर्शाने मोक्षामुळे सिद्ध झालेल्या पावन भूमी कुंथलगिरी येथे वार्षिक रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार िदनांक २४ ते २६ डिसेंबर दरम्यान या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक २४ रोजी सकाळी पूजा अभिषेक, दुपारी सर्व मंदिरावर ध्वजारोहण, दुपारी वाजता देशभूषण-कुलभूषण विद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. तत्पूर्वी दुपारी ११ ते वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी, दिनांक २५ राेजी सकाळी ९.३० वाजता पूजा अभिषेक, दुपारी वाजता रथयात्रा महोत्सव, तत्पूर्वी महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दिनांक २६ रोजी सकाळी पूजा अभिषेक, दुपारी महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या रथयात्रा महोत्सवाचा जिल्हाभरासह परिसरातील जैन बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरीचे अध्यक्ष अरविंद दोशी, उपाध्यक्ष सुभाष गांधी मंत्री वालचंद संघवी यांनी केले आहे.