पांगरी :- रक्तदान ही काळाची गरज असून प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करावे,रक्तदानाबाबतीत असलेले गैरसमज दूर करावेत असे प्रतिपादन पांगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी केले.ते पांगरी ता.बार्शी येथील पोस्ट चौकात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतिंनिमित्त मुस्लिम जमात व पांगरी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थाणी सरपंच युन्नुस बागवान होते.यावेळी माजी उपसभापती विजय गरड,उपसरपंच रामभाऊ गाढवे,तात्या बोधे,शशिकांत नारकर,डॉ.अरिफ शेख,नीलकंठ शेळके,सुहास देशमुख,धनंजय तौर,औदुंबर काकडे,सादिक पठाण,मोरे मेजर,शहाजी धस,अंकुश लाडे,रूपाली नारकर आदि मान्यवर उपस्थित होते॰
  या शिबिरात पांगरीतील अनेक तरुण युवकांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शोएब बागवान,अनिस शेख,शकिल बागवान,अस्लम बागवान,अल्लामिन शेख,किरण गरड यांच्यासह मुस्लिम जमात व पांगरी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन डॉ.अरिफ शेख यांनी केले.

 
Top