पांगरी (गणेश गोडसे) :- विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टीकोण जागृत होऊन ते विज्ञानवादी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कळंब पंचायत समितीच्या सभापति जयश्रीताई कांबळे यांनी केले.त्या विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा येरमाळा व गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यानिकेतन प्रशाळेत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उद्घाटक म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थाणी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापति लता पवार होत्या.यावेळी कळंबच्या गटविकास अधिकारी श्रीमती शांता सुरेवाड,गटशिक्षणाधिकारी चंद्र्कांत गावडे,उपसभापति विश्वनाथ तांदळे,येरमाळ्याचे सरपंच विकास बारकूल,नवोदय विद्यालय तुळजापूरचे प्राचार्य व वैज्ञांनिक मार्गदर्शक विजयकुमार बोस,प्रशाळेच्या संस्थापिका श्रीमती प्रभावती पाटील,विद्यानिकेतन प्रशाळेचे अध्यक्ष सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते॰
यावेळी तालुक्यातून आलेल्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी स्मार्ट व्हीलेज,पर्यावरण संतुलीत गांव आदीवर 80 प्रकल्प सादर केले.प्राथमिक गटातून 42,माध्यमिक गटातून32 प्रयोग सादर झाले.लोकसंख्या शिक्षण प्रवर्गातून प्राथमिक व माध्यमिक गटातून प्रत्येकी तीन प्रयोग सादर करण्यात आले.शैक्षणिक साहित्य निर्मितीत अकरा शिक्षकांनी प्रयोग सादर केले.माध्यमिक विभागात कळंबच्या विद्याभवन हायस्कूलच्या रोहण मिटकरीचा आपत्ती व्यवस्थापन प्रथम,येरमाळा येथील न्यानोद्योग विद्यालयातील विजय ठोंबरेच्या कृषि नियोजनास द्वितीय,कण्हेरवाडीच्या विद्याविकास विद्यालयाच्या अपरंपारिक ऊर्जा ला तृतीय क्रमांक मिळाला.प्राथमिक गटात बाभळगावच्या भाग्यश्री औसेकर हिच्या सोया दूध प्रकल्पास प्रथम,येरमाळा येथील विद्यानिकेतन प्रशाळेच्या वसुधा कचरे हिच्या सोलार एनर्जी प्रयोगास द्वितीय,रतणापुर येथील सृष्टी जाधवर हिच्या स्मार्ट व्हीलेज प्रयोगास तृतीय क्रमांक मिळाला.लोकसंख्या शिक्षण विभागात (प्रा)वाठवडा जि.प.शाळेचे आर.पी.माने प्रथम,धोरला जि.प.चे बि.एन.जमाळे द्वितीय,हासेगांव येथील एस.डी.बीडवे तृतीय आले.माध्यमिक गटातून कळंब जि.प.चे टी.एन.काजी प्रथम,इटकुर जि.प.सीएचआर एन.बि.पाळखे द्बितीय,येरमाळ्याचे डी.बि.मांडावे तृतीय आले.शैक्षणिक साहित्य मधून शिवपूर जि.प.चे एन.आर.शेळके प्रथम,ढोराळा जि.प.चे बि.एन.जमाळे व टी.एन.काजी यांना द्वितीय टीआर पंगांव येथील राजीव गांधी विद्यालयातील बि.एन.मडके यांना तृतीय क्रमांक मिळाला.सूत्रसंचालन आशा ताटे यांनी तर आभार वैभव पंडित यांनी मानले.