उस्मानाबाद :- कंळब तालुक्यातील दहिफळ येथील जिल्हा परिषद प्रशालेतील गुणवंत
विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते
मंगळवार दि. 10 जून रोजी करण्यात
आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय
कोलते, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, गट
शिक्षणाधिकारी यमुना देशमुख, सरपंच श्रीमती. शिल्पा चरणेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते मल्हार पाटील, उपसरपंच बालाजी मते, शाळा
व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती. जयश्री मते, उपाध्यक्ष सुधीर मते, शिवाजी
फाटक, पोपट पाटील, चरणेश्वर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अंकिता
भातलंवडे, प्राची मांडवकर, प्रणाली धप्पाधुळे, ऐश्वर्या वाघमारे, संगिता पायाळ, अभिजित
भातलंवडे आदी इयत्ता 10वी, 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच
शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हनुमंत पडवळ यांनी तर आभार श्री.माने यांनी
मानले. यावेळी प्रशालेचे शिक्षक, कर्मचारी
व ग्रामस्थ उपस्थित होते.