उस्मानाबाद :- विठुनामाचा जयघोष करीत शेगावहून
पंढरपूरकडे निघालेल्या श्री. संत गजानन महाराज संस्थानच्या
पालखी सोहळयाचे शुक्रवारी (दि.13) रोजी
शहरात आगमन झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात
स्वागत केले व पालकीचे दर्शन केले आहे.
यावेळी “सुखसमृध्दी येऊ दे, पाऊस पडू दे” असे साकडे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई
पाटील यांनी संत गजानन महाराजांना घातले. श्री गजानन महाराजांच्या नामाचा गजर,
वीणा, टाळ-मृदंगाचा गजर, घुमणारे भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात भाविक तेवढेच
तल्लीन होऊन “श्री” च्या दर्शनासाठी पुढे येत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे
अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय कुलकर्णी, सोपान खिलारे, प्रविण इंगळे,
अंकुश इंगळे, राजेश स्वामी, सतपाल धावारे यांनीही श्रीचे दर्शन घेतले.