औरंगाबाद
: राष्ट्रीय बंजारा मिशनच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीत फेरबदल होण्याची दाट शक्यता
आहे. राष्ट्रीय बंजारा मिशनचे माजी प्रदेशाध्यक्ष रोहिदास पवार हे आपल्या स्वगृही राष्ट्रीय
बंजारा मिशनमध्ये आपल्या पूर्व पदावर परत येणार असल्याचे समजते.
महाराष्ट्रात
जिल्हा, तालुका स्तरावर तसेच विशेषत: बंजारा समाजाच्या तांडयात राष्ट्रीय बंजारा मिशन
पोहचविण्याचे काम करत माजी प्रदेशाध्यक्ष पवार यांनी मोलाची कामगिरी पार पाडली होती.
काही घरगुती कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तरी ते लवकरच आपल्या
पूर्वपदावर परत येतील, अशी माहिती राष्ट्रीय बंजारा मिशनच्या सुत्राकडून मिळाली.