कळंब (भिकाजी जाधव) :-

तालुक्यातील ईटकूर परिसरातील तलाठी क्षेत्रातील साडेसहा हेक्टर भौगोलिक क्षेत्रावर बिच्याऱ्या शेतकऱ्याने आपेक्षेने सोयाबिन,कापूस या मुख्य पिकाची पेरणीपूर्व सर्व मशागती करून पेरणी केली, परंतु पावसाने पूर्ण पणे दडी मारल्याने शेतकरी पूरता हवालदील झाला असून तान्हुल्या पिकातील अंतर मशागती साठी मजूर दोनशे रुपये रोजंदारी एैवजी आव्वा च्या सव्वा गुत्ते पध्दतीने कामासाठी रुपयांची मागणी करीत असल्याने शेतकरी पूरता मेटाकूटीला आला आहे . यामुळेच पिके कोमात, मजूर जोमात, जिंताग्रस्त शेतकरी उन्हात अशीच परिस्थीती सध्या निर्माण झाली आहे .
शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करून, पेरणीसाठी उसणवारी बँकाचे कर्ज, सावकाराचे कर्ज,हातउसणे आर्थिक व्यवहार करून काळ्या आईची ओटी भरली, व भरपूर पाऊस पाणी होईल पिक चांगले येईल , आर्थिक उलाढाल होईल आणि यावर्षी तरी आपण डोळ्यावरील कर्जाच्या खाईतुन मुक्त होवू ही आशा बाळगुन शेतकरी असतानाच निसर्गाने आपल्या लहरी पणाची अवकृपा दाखवली आणि चक्क दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनून उन्हात आला आहे .
पूर्वी उत्तम शेती म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बाबीची परिस्थिती आजच्या विज्ञान युगात मात्र बिकट झाली आहे . अनेक रोगांच्या विळख्यात पिके आडकत असुन शेतकऱ्यासमोर शेतीच्या विविध समस्यांची आव्हाने नवनव्याने उभी राहात असल्याकारणाने शेती धोक्यात येत असून शेतकरी आर्थिक खाईत लोटला जात आहे .
कडउन्हात तान्हुल्या पिकांनी टाकल्या माना ..... पावसाने दडी मारल्याने व कडक उन पडल्याने पिकांनी माना टाकल्या असून पिके वाळु लागली आहेत . याबरोबाच सोयाबिनवर आळ्यांचा प्रादुर्भाव पडला आहे, तर कापसावर मावा , पिवळी पाने , पान गुंडाळीचा प्रादुर्भाव आहे . यामुळे परिसरातील पिके पूर्ण पावसाच्या प्रतिक्षेत कोमात आहेत.
मजूर मात्र जोमात .... सध्या मजूर वर्ग मात्र मोठ्या जोमात असुन दोनशे रुपये रोजंदारी प्रमाणे काम म्हटल्यास एक दिवसाच्या कामासाठी दोन दिवस मजूर लावतात, आणि वेळ पाहुनच कामकाज असे कांही मजुरांचे आलबेल आहे, गुत्ते पध्दतीने म्हटल्यास काम दोन दिवसाचे एक दिवसात, वेळ पाहाणे नाही अशी परिस्थीती निर्माण झाल्यामुळे शेतकरी मोठा काकुळतीला आला असुन चिंताग्रस बनला आहे.
शेतकऱ्याप्रती सकारचे धोरण म्हणजे क्रुर चेष्टा .... पाटील 
शेतकऱ्यांबाबत सरकाचे धोरण म्हणजे आगीत तेल ओतन्या सारखेच आहे आधीच विविध समस्येच्या धगीत होरपळत असलेल्या शेतकऱ्यांन्या तोंडाला पाने पुसण्याइतपत तुटपुंजी मदत देवून सरकार त्यांची क्रुर चेष्टा करत असल्याचे मत  उस्मानाबाद जिल्हापरिषदेचे माजी कृषि सभापती व शेतकरी प्रतापराव पाटील यांनी व्यक्त केले .
 
Top