तुळजापूर :- रविवार रोजी तुळजापूर येथे भारतीय संस्कृतीचे रक्षक व सर्व धर्म पंथातील देवदेवतांचे उपासक असणाऱ्या पारंपरिक लोककलवंताच्या समस्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच लोकाश्रय आणि राजाश्रय मिळावा या उद्दाम हेतूने प्रेरीत होवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

या महोत्सवास जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी उपस्थित राहुन कलावंतांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना महेंद्र धुरगुडे म्हणाले की, जिल्ह्यातील कलावंतांनी जिल्हा परिषद मध्ये अर्ज करावेत यामध्ये प्रत्येक वर्षी 60 कलावंतांची निवड करुन त्यांना मानधन मिळत असते. पुढे बोलताना म्हणाले की , 60 पेक्षा जास्त कलावंतांना मानधन देण्यात यावे यासाठी जिल्हा परिषद मध्ये ठराव घेऊन शासनाकडे पाठवुन व कलावंतांची संख्या वाढावी म्हणून  शासनाकडे पाठपुरावा करणार आसल्याचे सांगितले . आणि भटक्या कलावंतांना वासुदेव , गोंधळी या आदी. कलावंतांना एस. टी. चा पास मोफत देण्यात यावा ,  आणि त्यांच्या लागणार्‍या साहित्यसाठी शासनाने मदत करावी. या पाठपुरावा करणार असल्याचे महेंद्र धुरगुडे यांनी सांगितले. 

   यावेळी  राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे,  गोकुळ शिंदे , नगराध्यक्ष  बापूसाहेब कणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, कार्यक्रमाचे आयोजक तथा प्रांताध्यक्ष राजेंद्र गायकवाड (गोंधळी),  राजेंद्र बनारसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले , राष्ट्रवादी तुळजापूर शहराध्यक्ष संदीप गंगणे, अभिजीत कदम, रुतु भोसले आदी मान्यवर, महोत्सव चे आयोजक, संयोजक सदस्य आणि कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top