मुंबई :- पदमश्री रामसिंग भानावत जयंत (15 ऑगस्ट), माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मृतिदिन (18 ऑगस्ट), माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक जयंती (21 ऑगस्ट) यांचे औचित्य साधून वसंत विचारमाला अंतर्गत सामाजिक संघटनेच्यावतीने मुंबई येथे मंगळवार दि. 21 ऑगस्ट रोजी संयुक्त अभिवादन सभा व "मुंबईसह महाराष्ट्रातील गुन्हेगारी विश्व नष्ट करण्यामागील सुधाकरराव नाईक यांची भुमिका व योगदान" या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 21 ऑगस्ट रोजी मुंबई येथील शिवाजी नाटयमंदीर, दादर (प) येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळेत वसंत विचारमाला अंतर्गत विविध सामाजिक संघटनेच्यावतीने आयोजित संयुक्त अभिवादन सभा व चर्चासत्र कार्यक्रम होणार आहे. यावेळी नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य निलय नाईक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भटके विमुक्त नेते आ. हरिभाऊ राठोड, अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे सचिव-उपाध्यक्ष ना. मधुकर कांबळे, एआयबीएसएस चे राष्ट्रीय अध्यक्ष राजूसिंग नायक, उदयोगपती शंकर पवार, इनकम टॅक्सचे अतिरक्त आयुक्त जीवनलाल लावडीया, निवृत्त आयजीपी मोहन राठोड, विधानपरिषद सचिव उत्तमसिंग चव्हाण, ऑल इंडिया लबाना महासंघाचे एस.पी. सिंह लबाना आदीजण उपस्थित राहणार आहेत.
"मुंबईसह महाराष्ट्रातील गुन्हेगारी विश्व नष्ट करण्यामागील सुधाकरराव नाईक यांची भुमिका व योगदान" या विषयावर चर्चासत्रासाठी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, निवृत्त आयजीपी मेहरबान राठोड, श्रीकांत बापट, सुधाकर सुराडकर, उल्हास जोशी, माजी खासदार बिग्रेडीयर सुधीर सावंत आदी मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती वसंत विचाराधाराचे राजेश चव्हाण यांनी दिली.