तुळजापूर :- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे सदभावाना दिना निमित्त ऊपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या वतिने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४० विद्यार्थी व विद्यार्थिनिची एच.आय.व्ही, एच.बी,सी.बी.सी.चाचणी करण्यात आली.
शिबीराच्या ऊदघाटना प्रसंगी श्रीमती मोहळकर ए.जी म्हणाल्या की,एच.आय.व्ही सारख्या रोगामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. या रोगाबाबत समाजाने भिती किंवा संकोच बाळगु नए,आजची तरुण पिढी या रोगाविषयी प्रभावीपणे जनजागृती करु शकते.एड्स सारख्या रोगाला प्रतिबंध करुन याची संख्या शून्यावर आणण्याचे ध्येय शासनाचे आहे,असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केली.
सदभावना दिना बद्दल आपले विचार व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य म्हणाले की,आज माणसा माणसातील धर्म धर्मातील भेदभाव नष्ट झाला पाहिजे,तिरस्काराचा भाव समाजाला विनाशाकडे घेऊन जात असतो ,प्रत्येक व्यक्तिला सन्मान हा मिळाला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. या वेळी सद्भावना दिना निमित्त सामुहिक प्रार्थना देखील घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूञसंचलन प्रा.डॉ .मेजर वाय.ए.डोके यांनी केले या प्रसंगी प्रा.डॉ .शिवाजीराव देशमुख ,प्रा.बी.के.नगरे,प्रा.आशपाक आतार,प्रा.डॉ .आडे,प्रा.डॉ .बारबोले ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा.जी.व्ही.बाविस्कर यांनी मानले.