नवी दिल्ली : भारतातील जेष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात होते. काल मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कुलदीप नय्यर यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांनी युएनआय, पीआबी, द स्टेटसमन, इंडियन एक्सप्रेस मध्ये बराच काळ काम केले. नय्यर यांना २०१५ मध्ये पत्रकारीतेतील योगदानाबद्दल रामनाथ गोयंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुलदीप नय्यर यांच्या नावानेही पत्रकारीतेतील कार्याबद्दल पुरस्कार दिला जातो. नय्यर यांनी ८०हून अधिक वृत्तपत्रांसाठी १६ भाषांमध्ये लिखाण केले होते.
कुलदीप नय्यर हे सुरुवातीला उर्दू प्रेसचे पत्रकार होते. दिल्लीतील द स्टेटसमनचे संपादक म्हणून त्यांनी काम केले होते. आणीबाणीच्या काळात त्यांना अटकही झाली होती. ते १९९६ ला संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या प्रतिनिधीमंडळात सदस्य होते. १९९७ ला त्यांना राज्यसभा खासदारही म्हणून नियुक्ती झाली होती.
साभार - पुढारी ऑनलाईन