कळंब (भिकाजी जाधव) :-
उस्मानाबाद व बीड जिल्हा सिमेवर असलेल्या वाशी तालूक्यातील मौ. डोंगरेवाडी शिवारातील कोमेजून जात असलेल्या सोयाबीन पीकाचा हे छायाचित्र असून वांजराची कड असे संबोधल्या जाणाऱ्या या शिवारात पावसाने दडी मारल्याने सध्या शिवारात शुकशुकाट आहे. बळीराजा चिंताजनक आहे. दृष्ट लागावी असे पीक जोमात आलयं पण पावसाने ओढ दिल्याने पीकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.