लोहारा (इकबाल मुल्ला) :-
  लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात पार पाडली.यावेळी लोकशाहीरांच्या प्रतिमेसोबत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,भगवान गौतम बुद्ध,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यावेळी सरपंच बबन फुलसुंदर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले, त्यामध्ये ते म्हणाले "जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मला भिमराव" असे म्हणणारे थोर समाजसुधारक,आपल्या साहित्यातून समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारे,अण्णाभाऊ फक्त दीड दिवस शाळेत जाऊन जगप्रसिद्ध साहित्य निर्माण केले,समाजातील विषमता दूर करण्याचा अहोरात्र प्रयत्न केला, 'फकिरा" सारख्या जगप्रसिद्ध कादंबऱ्या निर्माण केल्या, "माझी मैना गावावर राहिली माझ्या  जीवाची होतीया काहिली',यासारख्या छक्कडीतून समाजातील अनेक अनिष्ठ परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला असे ते म्हणाले. समतादूत किरण चिंचोले यांनी आपल्या प्रबोधनातून गावकऱ्यांचे मने जिंकले,व्यसनाधिनतेवरील गीत गाऊन अनेकांना मंत्रमुग्ध केले.यावेळी सरपंच बबन फुलसुंदर,उपसरपंच लक्ष्मण भुजबळ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हणमंत दणाने,जयंती समितीचे अध्यक्ष रघुनाथ दणाने,ग्राम पंचायतचे सदस्य विलास फुलसुंदर,प्रभाकर दणाने,छायाबाई तिमन्ना पवार, बिभीषण पवार,माजी सदस्य भागवत दणाने,व्यंकट दणाने,विठल दणाने, शिवाजी दणाने,नाशिक दणाने, राम दणाने,उत्तम दणाने,विनोद गायकवाड,सूरज पवार,अण्णा गायकवाड,महादेव दणाने,जयश्री दणाने,विजया दणाने, मीना दणाने,आशा दणाने, निर्मला दणाने यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top