![]() |
आदेश कोळी |
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काटी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2017 मध्ये थेट जनतेतून बहुमताने निवडून आलेले सरपंच आदेश कोळी हे पंचायत समिती सदस्य असताना ते सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यास पात्र नसताना देखील त्यांनी निवडणूक लढविली म्हणून ते सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरतात म्हणुन काटी येथील संजय बाजीराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचेकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ज-2) नुसार तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी सरपंच आदेश कोळी यांना अपात्र ठरविले होते.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या या निर्णयाविरुध्द सरपंच कोळी यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयास अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी मे 2018 मध्ये स्थगिती दिली होती.
या निर्णयाची अप्पर विभागीय आयुक्त , औरंगाबाद यांचे समोर 30 जुलै रोजी अंतरिम सुनावणी होऊन कोळी हे पंचायत समिती सदस्य असताना काटी ग्रामपंचायतची थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक लढविली होती व ते 10 ऑक्टोबर 2017 रोजी निवडून आले होते व त्यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा 23 जुलै 2017 रोजी दिला व 30 जुलै 2017 मंजूर करण्यात आला होता. व कोळी यांनी 23 नोव्हेंबर 2017 रोजी पदभार स्वीकारला असल्याचे निदर्शनास आणून दिले. व त्यांचा पदाचा कालावधी महाराष्ट्र अधिनियम 1958 चे कलम 28 नुसार ग्रामपंचायत पहिल्या सभेच्या तारखेला सुरु होतो. त्यानुसार सरपंच कोळी यांनी 23 नोव्हेंबर रोजी पदभार घेतला व त्यापुर्वी म्हणजे पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा 23 ऑक्टोबरला दिला असल्याचे निदर्शनास आल्याने अप्पर विभागीय आयुक्त, शिवानंद टाकसाळे यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय रद्द ठरविण्यात आला. त्यामुळे सरपंच आदेश कोळी यांचे सरपंचपद अबाधित राहीले असून बुधवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.