![]() |
स्वर्गीय मदन गरड |
बार्शी (गणेश गोडसे) :- घरामधील एखाद्या दुखःद घटनेनंतर पाळण्यात येणारा दुखवटा, सुतक यामुळे सध्याच्या आधुनिक काळात व धावत्या युगात विधायक पाऊल टाकत त्यामध्ये बदल करूण तो बदल स्विकारून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात आहे. आगळगाव ता.बार्शी येथेही गरड कुंटूबीयाने आधुनिकतेची कास धरून दुखवट्याबाबत एक पाऊल पुढे टाकुन फक्त सहा दिवसाचे सुतक पाळण्याचा निर्धार करूण तसा ठराव केला आहे.
समाजात रूळलेल्या वाटेवरूण सर्वचजन चालतात.मात्र वाट सोडुन दुसरी वाट निर्माण करण्याचे धाडस सहसा कोणी दाखवत नाही. दुखवट्याबाबत समाजात जुन्या रूढी परंपरेप्रमाणे समाजातील एखादी व्यक्तीचे निधन झाल्यास त्या निधन झालेल्या व्यक्तिच्या अग्निदहणानंतर तिसऱ्या दिवशी सावडणे, रक्षा विसर्जन करणे तसेच दहावा आणि तेरावा दिवसाचा विधी करण्याची प्रथा प्रचलित आहे.मात्र या विधि कालावधी दरम्यानच्या तेरा दिवसांमध्ये भाव भावकीमधील,नात्यामधील सर्वच कुटुंबात दुखवटा पाळला जातो.कांही गावात एकाच आडनावाची,भाव भावकीची असंख्य घरे असतात.त्यामुळे कित्येकवेळा त्या गावातील सुतकच संपत नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.पुर्वीच्या काळात दळणवळणासाठी वाहनांची आवश्यक व्यवस्था नसल्यामुळे व पै पाहणे,नातेवाईक, भावकीतील स्वकिय यांना गावाकडे येण्यासाठी बराच कालावधी लागत असे.त्यामुळे पुर्वजांनी तत्कालीन परिस्थितीमुळे वेगवेगळ्या विधींची रचना केली होती.जेनेकरूण प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी विधी सापडावा हा हेतु ठेऊन वेगवेगळे विधीची रचना करण्यात आली होती.
मात्र समाजाच्या बदलत्या रुपास आणि दळणवळणाच्या सुधारलेल्या साधनास अनूसरुन तेरा दिवसांचा दुखवटा व विधीमध्ये समाजात बदल होणे अपेक्षित व गरजेचे समजुन आगळगाव येथील गरड कुटुंबातील सदस्यांनी दुखःद घटनेच्या प्रसंगाही एक बैठक घेऊन जेमतेम सहा दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या समाज विधायक बदलासाठी स्वर्गीय मदन गरड (गुरूजी) हे गत दोन-चार वर्षांपासून आग्रही होते.
त्यांच्या इच्छेस अनुसरून आगळगांवमधील सर्व गरड कुटुंबीयांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व गरड कुटुंबीयांनी एकमताने निर्णय घेतले आहेत. अग्निदहन व तिस-या दिवसाचा सावडणे हा कार्यक्रम पूर्वापार ठरल्याप्रमाणे करणे,पूर्वापार चालत आलेला दहाव्या दिवशीचा दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करणे, दुखावट्या मधील शेवटचा- तेरावा दिवसाचा विधी, सहाव्या दिवशी करणे,रक्षा विसर्जन, दशक्रिया विधीचे ठिकाण, हे त्या-त्या कुटुंबीयांच्या सोयीने व इच्छेनुसार करण्यात येईल असे एकमताने ठरवण्यात आले.
बदलत्या काळानुसार आपणही बदलले पाहिजे, गुरूजींचा दुखवटा संदेश आम्ही प्रत्यक्षात राबवत असून सहा दिवसांचा दुखवटा पाळत आहोत. कुंटूबिय सहा दिवसांचाच दुखवटा पाळणार असल्याचे धनराज मदन गरड, (मुख्य लेखापरीक्षक, नवी मुंबई महानगर पालिका) यांनी सांगितले.