नळदुर्ग :- शिक्षकांनी कार्यरत असलेल्या गावांमध्ये ज्ञानदान करण्याबरोबर परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, उस्मानाबाद हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यामुळे शिक्षकांनी या शेतकऱ्यांचे समुपदेशन केल्यास एक चांगले कार्य आपल्या हातून घडू शकते, असे सांगून शिक्षकांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर असून मला कधीही फोन करा, असे जि. प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी नळदुर्ग येथे सांगितले.
तुळजापूर तालुका शिक्षक सहकारी पत पुरवठा संस्थेची ४४वी वार्षिक सर्व साधारण सभा नळदुर्ग येथिल अंबाबाई देवस्थान सभागृहात बुधवार दि. 22 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. यावेळी महेंद्र धुरगुडे हे बोलत होते. पुढे बोलताना धुरगुडे म्हणाले की, यावेळी त्यांनी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्ष आर्चना पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या कार्याचा विशेष गौरवपुर्ण उल्लेख केला. व नळदुर्गसारख्या निसर्गरम्य ठिकाणी सभा आयोजित केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील तर व्यासपीठावर प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे , जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पडवळ, जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे, प्रकाश चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, उस्मानाबाद पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत मिटकर, माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के, नगरसेवक नितीन कासार, शिवसेनचे शहराध्यक्ष संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकूर, डॉ. जितेंद्र कानडे, अशोक पाटील, प्राचार्य इंगळे, नगरसेविका भारती बनसोडे आदीजण उपस्थित होते.
प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व माजी खासदार गुरुदास कामत यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. यावेळी जळकोट जि.प. प्राथमिक शाळेच्या विदयार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. प्रमुख मान्यवरांचा पतसंस्थेच्यावतीने श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात शिष्यवृत्तीधारक व नवोदय उत्तीर्ण विदयार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास निलकंठ इटकरी, अशोक जाधव, विजय यादगिरे, विक्रम मगतराव, मंदाताई मुळे, रेश्मा मोरे, संतोष देशपांडे आदींसह पतसंस्थेचे तुळजापूर तालुक्यातील सभासद व अनेक मान्यवर मोठया संख्येनी उपस्थित होते.
पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीप शिंदे, सचिव धनाजी मुळे, संचालक विठ्ठल गायकवाड, धनंजय पंडीत, बाबू चव्हाण, अविनाश मोकाशे, गणेश रोचकरी, श्रीमती कुरुम जयश्री, श्रीमती राऊत सुरेखा, सुनिल सुर्यवंशी यांच्यासह पतसंस्थेच्या सभासदानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत मिटकर यांनी तर सुत्रसंचालन शशी किरण यांनी केले.