तुळजापूर (दास पाटील) :-

तालुक्यातील काक्रंबा येथील मातंगनगरमधील जुन्या समाज मंदीराची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त होत आहे. या समाजमंदीराची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य किसन देढे यांनी केली आहे.



तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे मातंगनगर येथे सुमारे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी समाज मंदीर उभारण्यात आले होते. सध्या या समाज मंदीरातीच्या छताचे प्लास्टर  खाली गळून पडत आहे. तसेच स्लॅबच्या  सळया उघड्यावर पडल्या आहेत. याठिकाणी सध्या कसलीही विद्युत व्यवस्था नाही. दरवाजे, खिडक्यांची मोठी मोडतोड झाली आहे. फरशा खचून दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील रहिवाशांचे छोटेमोठे कार्यक्रम पूर्वी याठिकाणी होत होते. मात्र आता या समाजमंदीराची प्रचंड दुरावस्था झाल्याने येथे सध्या कसलेही कार्यक्रम होत नाहीत. प्रचंड दुरावस्था झालेल्या धोकादायक समाजमंदीराच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने तात्काळ हाती घेऊन पूर्ण करण्याची मागणी समाजबांधवांमधून होत आहे.

 
Top