उस्मानाबाद, दि. १२ : लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जपतीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 10.04.2020 व 11.04.2020 या दोन दिवशी उस्मानाबाद (श.)- 11, उस्मानाबाद (ग्रा.)- 10, आनंदनगर- 4, बेंबळी- 2 तुळजापूर- 64, तामलवाडी- 7, ढोकी- 5, कळंब- 109, शहर वाहतुक शाखा- 72, शिराढोण- 19 अशी एकुण 303 वाहने ताब्यात घेतली आहेत.