बार्शी, दि. १२ :

बार्शी-तुळजापूर रस्त्यावरील बावी गावातील निर्मानाधीन कमान कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

महेश भारत डोळज (वय 27, रा. वैराग), विकास सुग्रीव वाळके ( वय 32, रा. मानेगाव), दिपक संग्राम घोलप (वय 32, रा. दडशिंगे) अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. याबाबत माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात कमानीचे काम कसे सुरु होते,असा प्रश्न उपस्थित होत आहे. झालेल्या घटनेला जबाबदार कोण, बार्शी तालुका पोलीस यावर काय कारवाई करणार असा सवाल विचरण्यात येत आहे. पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.
 
Top