उस्मानाबाद, दि. २८ :
हर्षवर्धन राउत रा. उस्मानाबाद यांनी दि. 27.04.2020 रोजी 14.40 वा. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे लोकांची गर्दी निर्माण करुन अन्नधान्य वाटप केले. त्यांच्या या कृती मुळे कोरोना संसर्गजन्य आजाराच्या संक्रमनास वाव होउ शकतो हे माहित असतांना देखील त्यांनी निष्काळजीपणाचे कृत्य करुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या पोहेकॉ- अविनाश पतंगे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.