उस्मानाबाद, दि. २८ : उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व सिमा विनापरवाना प्रवासास बंद केल्या आहेत. तरीही पोलीस नाकाबंदी टाळून छुप्या मार्गाने आलेले 1)साहेल हसन इनामदार रा. रा. बलसूर, ता. उमरगा हा दि. 19.04.2020 रोजी बाहेर जिल्ह्यातून मौजे बलसूर येथे आला. तर, 2)हुल शिवाजी बाबर 3)महादेव लक्ष्मण बाबर 4)परमेश्वर विनायक धोपरे तीघे रा. धानुरी, ता. लोहारा हे तीघे दि. 21.04.2020 ते 25.04.2020 या कालावधीत बाहेर गावाहुन मौजे धानुरी गावात आले. तर 5)बळीराम रामदास जाधव रा. दगडधानोरा, ता. उमरगा हे बाहेर गावाहून दि. 17.04.2020 रोजी दगडधानोरा गावी आले. तसेच 6)तोसीफ इक्बाल शेख 7)अनिकेत गायकवाड दोघे रा. जामखेड हे दि. 27.04.2020 रोजी सोनगिरी, ता. परंडा येथे आले. अशा रितीने वरील सर्वांनी मा.जिल्हाधिकारी यांच्या लॉकडाउन संबंधी विविध आदेशांचे- कायद्याचे उल्लंघन केले आहे. अशा मजकुराच्या संबंधीत गावच्या पोलीस पाटील- ग्रामसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील व्यक्तीविरुध्द स्वतंत्र 4 गुन्हे भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 अन्वये गुन्हा दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
 
Top