नळदुर्ग, दि. 23 :-
कोरोनाचे प्रसार रोखण्यासाठी देशासह राज्यात लाॅकडाऊन संचार बंदी लागू करण्यात आले आहे,कोरानाला परभूत करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील अधिकारी,कर्मचारी प्रयत्न करत आहेत,
उस्मानाबाद जिल्हातील उमरगा व लोहारा या तालुक्यात दोन रूग्न आढळून आले होते,माञ त्याच्यावर करण्यात आलेल्या उपचारानंतर ते दोन्ही रूग्न सध्या कोरोना मुक्त झाले आहेत, आता जिल्ह्यत एकही रूग्न नसून जिल्हा ग्रीनझोन मध्ये येण्याची शक्यता आहे,तरी खबरदारी म्हणून रूग्न आढळेले उमरगा व लोहारा हे दोन्ही तालुके जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रवेश बंद करुन शिल करण्यात आले आहेत.
माञ असे असतानाही तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे कार्यारीत असलेले ग्रामसेवक हे निष्काळजीपने मनमानी कारभार करत त्यांच्या उमरगा तालुक्यातील बलसूर या मूळगावी अप-डाउन करत आहेत. कोरोणाचा पहिला रूग्न आढळलेले बलसूर हेच गांव असून ग्रामसेवक अप-डाउन करत असल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच ग्रामसेवकास लोहगाव या एकाच ग्रामपंचायतीचे चार्ज असताना चार दिवसाला एक वेळेस गावात येतात,को रोना पार्शभुमीवर मुख्यालयी राहून वेळीच उपयोजना राबविण्याचे शासनाचे अदेश आहेत,असे असतानाही ग्रामसेवक शासनाच्या नियमाचे उलंघन करत निष्काळजीपना करत असल्याने ग्रामस्थातून नाराजी व्यक्त होत आहे, कोरोनाच्या पार्शभुमीवर निष्काळजीपना करणार्या ग्रामसेवक यांच्यावर कड़क कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांनी तुळजापूर पंचायत समितीचे बिडिओ प्रशांतशिह मरूड यांच्याकडे केली आहे.
या बाबत बिडिओ मरूड यांना संपर्क साधला असता तात्काळ चौकाशी करून योग्य कार्रवाई करणार असल्याचे असल्याचे सांगीतले. शासनाच्या नियमाचे निष्काळजीपने उलंघन करणार्या ग्रामसेवक यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे,