उस्मानाबाद, दि. ०४ : लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश बंद आहे. तरीही छूप्या मार्गाने, आडवाटेने विनापरवाना जिल्ह्यात लोक येत आहेत. प्रदीप कांबळे, तानाजी वाघमारे, संतोष गायकवाड, निळकंठ सगर, ओंकार भोसले सर्व रा. होर्टी, ता. तुळजापूर हे हैद्राबाद, मुंबई, पुणे येथून मौजे होर्टी येथे आले. तर, 1)पंडीत आपण्णा हालसगे 2) महानंदा पंडीत हालसगे दोघे रा. बोरामणी, ता. सोलापूर हे दोघे पती- पत्नी दि. 04.05.2020 रोजी मौजे लोहारा (बु.) येथे आले. तर, 3)अर्जुन शेटीबा पवार 4)फुलाबाई अर्जुन पवार 5)कृष्णा अर्जुन पवार 6)युवराज अर्जुन पवार सर्व रा. आसु, ता. परंडा हे पुणे येथून आसु येथे आले. अशा प्रकारे त्यांनी कोरोना- लॉकडाऊन काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन संबंधीत गावच्या पोलीस पाटील/ ग्रामसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.