संतोष पुदाले

नळदुर्ग, दि. ०४ :

 नळदुर्ग शहरात चालु असलेला बाजार रोजच्या प्रमाणे सुरळीत चालू ठेवण्याची मागणी शिवसेनेचे नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे...

 नळदुर्ग शहरामध्ये लॉकडाऊन मुळे दररोज भाजीपाला विक्री होत आहे. तरी आता आठवड्यातून फक्त एका दिवशी बाजार भरवला तर योग्य होणार नाही.  भाजीपाला उत्पादक शेतकरी हा सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्यांना नळदुर्ग  येथे भाजी विकण्यास सोयीचे ठरत आहे. कारण नळदुर्ग शहराशी  आजूबाजूला असणाऱ्या 50 खेड्यातून शेतकरी भाजी पाला विकायला नळदुर्ग येथे आणत असून सध्या शेतकऱ्यांसाठी नळदुर्ग येथील बाजारच त्यांच्यासाठी संजीवनी ठरत आहे. जर आठवड्यात  एकाच दिवशी बाजार भरला तर शेतकऱ्याना मोठ्या गैरसोयीचे व आर्थिक नुकसानीची झळ बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर  भाजीपाला  हा खराब होईल आणि शेतकरी माल खराब होऊ नये म्हणून सोलापूरकडे जाण्याची दाट शक्यता आहे.  सध्या सोलापूर मध्ये कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता स्थिती व जिल्हाबंदीमुळे  नळदुर्ग येथे  आठवड्यातुन एकदा बाजार  न भरता शेतक-याच्या हितासाठी  दररोज भाजी विक्रीस परवानगी दयावी.  अन्यथा भाजी विकण्यासाठी शेतकऱ्याकडे सोलापूर हा एकमेव पर्याय असुन  असून कोरोना या संसर्गजन्य  रोगाचा प्रसार उस्मानाबाद  जिल्ह्यात व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून ठराविक  वेळ देऊन नळदुर्ग  येथेच हा भाजीपाल्याचा बाजार दररोज भरवण्याची मागणी  शिवसेनेचे नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले यानी केली आहे.
 
Top