तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

शेतकरी राजा अर्थिक संकटात सापडल्याने शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद, तसेच तहसीलदार तुळजापुर याना दि.२५ रोजी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

     भारत देशामध्ये सध्या कोरोना या जिवघेण्या विषाणू ने थैमान घातले असुन जगाचा पोशिंदा शेतकरी राजा अर्थिक संकटात सापडला आहे.या संकटात सापडलेल्या शेतकरी राजाला दिलासा मिळावा यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने जिल्ह्यातील बोगस व खराब प्रतीचे बियाणे विक्री करणार्या दुकानावर धाडी मारून बियाणे जप्त करावे व अशा दुकानावर कारवाई करावी, शासनाची शेतकर्यांच्या बांधावर बि -बियाणे योजना तात्काळ आमलात आणावी,कर्ज वेळेवर परतफेड करणार्या शेतकर्यांना शासनाने घोषीत केलेले प्रोत्साहनपर ५० हजार रूपये या योजनेची अंमलबजावणी करावी तसेच जिल्ह्यातील शेतकर्यांचे पीक कर्ज अर्ज बॅंकेत जमा केल्यापासुन सात दिवसात कर्ज रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार तुळजापुर याना दि.२५ रोजी देण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास प्रत्येक तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर सतिश लोंढे विभागीय अध्यक्ष (संस्कृत विभाग),भ्रष्टाचार निर्मुलन जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत,तालुकाध्यक्ष शंकर कदम यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.

    निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत,तालुकाध्यक्ष शंकर कदम उपस्थित होते.

 
Top