कल्याण राव आखाडे 

खानापूर : बालाजी गायकवाड 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण राव आखाडे यांना विधानापरिषेदेवर संधी द्यावी अशी मागणी सावता परिषदेचे तुळजापूर तालुकाध्यक्ष महादेव माळी यांनी केली आहे.

 कल्याणराव आखाडे हे अतिशय धडाडीचे व अभ्यासू नेतृत्व असून सावता परिषेदेच्या माध्यमातून त्यांनी माळी समाजाला मोठ्याप्रमाणात संघटीत केले आहे. त्यांनी आतापर्यंत माळी समाजाच्या लढ्यासाठी मोठे योगदान दिले आहे.राज्यभरात सावता परिषदेचा कार्यविस्तार मोठ्या आहे. यात राज्यातील माळी समाज जोडला गेलेला आहे.सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाला माळी समाजात मानणारा राज्यभरात मोठा वर्ग आहे. विधानसभा निवडणुकीत कल्याण आखाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील माळी समाज मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या बाजूने झुकला होता. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला याचा मोठा फायदा झाला होता.

     विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील अनेक दिग्गज मात्तबर नेते भाजपाची सत्ता येणार आहे अशी आशा बाळगून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत तेव्हा कल्याण आखाडे यांनी सत्तेला लाथ मारत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याचे धाडस केले आहे.विधानसभेच्या ऐन मोक्याच्या व गरजेच्या वेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे सत्तेत असलेल्या भाजपाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष मा.शरद पवार यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.त्यांचा हा बीड मतदारसंघासह राज्यातील अनेक मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी फायद्याचा ठरला. एकंदरीत कल्याणराव आखाडे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात माळी फॅक्टर प्रभावी पडला हे अनेकांनी मान्य केले आहे. विधान परिषदेवर संधी दिल्यास कल्याण आखाडे यांना माळी समाजसह ओबीसी समाजाचा आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात जनाधार प्राप्त होईल. त्यामुळे कल्याण आखाडे यांसारख्या उमद्या नेतृत्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांच्या कोट्यातून विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी सावता परिषदेचे तुळजापूर तालुकाध्यक्ष महादेव माळी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

महादेव माळी


 
Top