तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापुर शहरातील एका २८ वर्षीय तरुणाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली. मागील सहा दिवसातील ही दुसरी घटना आहे. या अगोदर २५ जुलै रोजी एका युवकाने आत्महत्या केली होती. ती घटना ताजी असतानाच अजून एका युवकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.


या बाबत सविस्तर माहिती अशी की, तुळजापुर शहरातील जवाहर गल्लीतील भागात राहणाऱ्या नितेश उर्फ (टिल्लु) दिलीप कदम वय वर्षे २८ या तरुणाने आपल्या राहत्या घरातील दुसऱ्या मजल्या वरील बाथरुम मध्ये दि.३० गुरुवार रोजी सायंकाळ च्या सुमारास अज्ञात कारणामुळे साडीने गळफास लावुन आत्महत्या केली. या तरुणाने नेमकी आत्महत्या कशामुळे केली याचे कारण समजु शकले नाही. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या नातेवाईकाच्या खबरीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली. 

विशेष म्हणजे  मयत नितेश (टिल्लु) कदम हा  अविवाहित होता. तो अंत्यत मनमिळावु स्वभावाचा होता. त्यास क्रिकेट फार आवड होती. त्या भागात राहणाऱ्या  मिञ कंपनीचा फार आवडता होता. त्याच्या या अचानक निघुन जाण्याने त्याच्या कुंटुबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथील जवाहर गल्लीतील भागात शोककळा पसरली होती. त्याच्या पार्थिवावर  दि.३१ शुक्रवार रोजी सकाळी येथील घाटशीळ रोड वरील स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

गेल्या चार माहिन्यापासुन संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे तुळजापुर  शहराची व्यापार उद्योग क्षेत्र आदीसह व्यवसाय ठप्प झाल्याने याचा फटका सर्व सामान्य नागरीकांना बसल्यामुळे आर्थिक विवंचनेने आत्महत्या चे सञच सुरुच आहे. या चार माहिन्याच्या कालावधीत चार ते पाच तरुण युवकांनी व एका माहिलेनी आत्महत्या केल्याने तुळजापुर शहरातील नागरीकांतुन चर्चेले जात आहे.
 
Top