तुळजापूर, दि. 29 : शहरालगत असणा-या घाटशीळ घाटात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून सदरील घाटातून येणा-या अवजड वाहनांची वाहतुक बंद करा, अशी मागणी बुधवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तुळजापूर तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. सदरील निवेदनाची दखल घेत तहसिलदार यांनी तुळजापूर पोलीस ठाणे व सार्वजनिक बांधकाम विभागास तातडीने याग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. 

तुळजापूर शहरातील सोलापूर रोड हा घाट परिसरात आहे व तो एस आकाराचा आहे. त्यामुळे त्या घाट क्षेत्रात वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या ठिकाणी अनेकांनी आपला जीव सुध्दा गमावला आहे. त्यामुळे घाटातून येणारे सर्व अवजड वाहने बंद करण्यात येवून ते शहराबाहेरील बायपास या मार्गाने सोडण्यात यावे, जेणेकरुन अवजड वाहनास तारेवरची कसरत करण्याची गरज भासणार नाही, असे निवेदनात नमूद केले होते.
या निवेदनावर मनसेचे जिल्हासंघटक अमरराजे कदम, शहराध्यक्ष धर्मराज सावंत,अक्षय साळवे तालुका उपाध्यक्ष, प्रमोद कदम जिल्हाध्यक्ष मनविसे, सुरज कोठावळे जिल्हासचिव मनविसे, समीर शेख जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, उमेश कांबळे झुंबर काळदाते तालुका उपाध्यक्ष मनसे, सौरभ लोखंडे तालुका अध्यक्ष मनविसे, विशाल माने शहर उपाध्यक्ष मनसे, आदी पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top