उस्मानाबाद, दि. 29 : महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री ना. आदित्यजी ठाकरे यांना उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पावसाळ्यात तात्काळ पवन चक्की बंद करण्याबाबतचे निवेदन मनसेचे जिल्हासंघटक अमरराजे कदम,जिल्हा सचिव दादा कांबळे उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्ष जालिंदर भाऊ कोकणे यांच्याकडून नुकतेच देण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्यात प्रतिवर्षा पेक्षा यावर्षी कमीच पाऊस झालेला आहे याचे कारण यावर्षीच जिल्ह्यातील पवनचक्की चालू झालेल्या आहेत. पवनचक्कीमुळे आलेले ढग पुढे सरकले जातात की काय असे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहेत.प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे जेणेकरून पुढील वर्षी दुष्काळीचे चटके सर्वसामान्य व शेतकरी यांना बसू नये अशी ही मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे.याबाबींची सरकारकडून चौकशी समिती नेमून शहानिशा करून घ्यावी असे निवेदनात नमूद केलेले आहे.येत्या आठ दिवसात प्रशासनाने या मागणीची दखल नाही घेतली तर संपुर्ण जिल्हाभर तिव्र आंदोलन घेतले जाईल असा इशारा प्रशासनास देण्यात आलेला आहे.

निवेदनावरती मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम,जिल्हा सचिव दादा कांबळे,अध्यक्ष  उमरगा लोहारा विधानसभा,अजय पवार व अमोल सलगरे यांच्या स्वाक्ष-या आहेत.
 
Top