काटी : उमाजी गायकवाड

महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतचा कार्यभार चालवण्यासाठी प्रशासक नेमणे आवश्यक आहे. पंचायत समिती  गणातील सदस्यांना प्रत्त्येक गावातील जनतेने निवडणुकीद्वारे निवडणून दिले असल्याने त्या गणातील सदस्यांना त्या गणातील भौगोलिक परिस्थितीची आणि त्या गणातील आवश्यक विकासकामांची पुरेशी माहिती आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पंचायत समिती संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गणातील पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील पंचायत समिती संघर्ष समितीच्या वतीने मुदत संपलेल्या गणातील  ग्रामपंचायतवर गावातील विकासकामे योग्यरीत्या करण्यासाठी प्रशासक म्हणून संबंधित पंचायत समिती सदस्यांची निवड करण्यात यावी अशी मागणी उस्मानाबाद निवासी उपजिल्हाधिकारी खंदारे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. संबंध महाराष्ट्रात अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र प.स.सघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
    उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र पंचायत समिती संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे, प्रवर्तक गजेंद्र जाधव उस्मानाबाद,सौ.कविता नागनाथ कलसुरे, प्रदीप शिंदे, श्री चांदणे, नायकल, आदी पंचायत समिती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top