तुळजापूर : कुमार नाईकवाडी
गेल्या चार महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे पूर्ण अर्थचक्र थांबले आहे. लोंकांच्या हाताला काम नाही.जनता प्रचंड अडचणीत सापडली आहे,त्यामुळे शेती आणि घरगुती चे संपुर्ण वीज बिल माफ करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन करण्यात आले आहे.
तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या या महाभयंकर महामारीच्या संकटामुळे सर्व व्यवसाय, छोटे-मोठे उद्योग बंद पडले आहेत. तसेच नागरीक गेले चार महिन्यापासुन घरात बसुन आहेत. अशातच विजवितरण कंपनीने भरमसाठ वीज बिल पाठवली आहेत. नागरिक गेल्या ४ महिन्यापासून चिंताग्रस्त असताना हे नवीन आर्थिक संकट ओढवले आहे. सर्व नागरीकांना दिलासा देण्यासाठी म्हणुन तुळजापूर तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांचे असलेले संपूर्ण वीज बिल माफ करावे. जर वीजबिल माफ केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल .असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर महेश जाधव जिल्हाउपाध्यक्ष, मयुर गाढवे विधानसभा अध्यक्ष, मल्लीकार्जुन कुंभार तालुकअध्यक्ष, धनाजी साठे तालुका सचिव, रोहित दळवी तालुकाउपाध्यक्ष, प्रशांत डोलारे तालुकाउपाध्यक्ष, राहुल गायकवाड तालुकाउपाध्यक्ष, अविनाश पवार शहरउपाध्यक्ष, अकाश पवार तालुकाउपाध्यक्ष, शिवाजी झाडपिडे तालुकाउपाध्यक्ष, रूषी माने शहरउपाध्यक्ष वि. से, युवराज पूरी आदी मनसैनिकांच्या स्वाक्ष-या आहेत.