खानापूर : बालाजी गायकवाड
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा शालेय शिक्षण बांधकाम महिला व बालकल्याण राज्यमंत्री प्रहार अपंग (दिव्यांग) क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये पाच लाख वृक्ष लागवडीची संकल्पना राबवण्यात येत आहे.याला प्रतिसाद देत काटगाव मध्ये वृक्षरोपण करण्यात आली.
येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी यांच्यावतीने काटगाव परिसरातील टेलर नगर रोड, अंबिकानगर ,तुळजाभवानी ई-सेवा केंद्र देवकुरळी रोड, तुळजाभवानी मंदिर परिसर अशा विविध ठिकाण ,चिंच,आवळा,लिंब अश्या,पन्नास वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.
यावेळी काटगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन तानाजी बेटकर,पोलीस पाटील साधू माळी , रवीकिरण माळी गणेश माळी सामाजिक कार्यकर्ते, सागर पाटील, अप्पासाहेब असापुरे,शेखर वर्दे,सचिन कळके ग्रामपंचायत रोजगार सेवक इरफान शेख, हरून मासुलदार नागेश खोबरे, अजय रोकडे व गावातील ग्रामस्थ प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.