तुळजापूर : कुमार नाईकवाडी
अयोध्यात उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदीर भूमी पुजन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी क संपूर्ण अध्यशक्तीपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मंदीरातील श्री कल्लोळ व गोमुख तिर्थकुंडातील पविञ जलाचे विधीवत पुजन करुन हा पविञ जल बुधवार रोजी अयोध्या कडे रवाना करण्यात आले.
बुधवार दि.२९ जुलै रोजी श्री तुळजाभवानी मंदीरातील 108 नद्याचा संगम म्हणून प्रचलित असलेल्या श्री कल्लोळ व श्री गोमुख तिर्थ या दोन पविञ कुंडातील जल आणि त्यानंतर श्री रामवरदायनी देवी मंदीरातील देवीच्या पायाचे कुंकु व राम विश्रांती साठी थांबलेल्या घाटशिळ या पविञ स्थानातील मृतिका घेवुन याचे राजेशहाजीमहाध्दार समोर पुजन करुन ते अयोध्या कडे रवाना करण्यात आले.
यावेळी मंहत दत्तअरण्य महाराज हभप चौरे महाराज, अर्जून सांळुके विश्व हिंदू परिषदेचे धाराशिवकर, तालुकाध्यक्ष प्रा काकासाहैब शिंदे आदीसह हिंदूत्ववादी कार्यकर्ते, कार्यकर्त्या यावेळी उपस्थिती होते.