जळकोट,दि.४ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील राज ठाकरे यांच्या विचाराशी कट्टर असलेले मल्लिकार्जुन कोंडाप्पा कुंभार यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी एका बैठकीत ही निवड जाहीर केली.
मल्लिकार्जुन कुंभार हे शालेय जीवनापासूनच राजकारणाचा छंद असलेले व्यक्तिमत्व आहे. महाविद्यालयीन जीवनातहि त्यांनी अनेक उपक्रमात सहभाग नोंदवला होता. राज ठाकरे यांच्या विचारांशी ठाम असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे यांच्या अनेक दौऱ्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता.२००६ सालापासूनचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कार्याला पहिल्यांदा संधी मिळाली. ती म्हणजे २००७ साली मनसेचे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष म्हणून संधी मिळाली. या पदावर असताना अनेक आंदोलने केले होते. त्यानंतर २०१० साली मल्लिकार्जुन कुंभार यांची विद्यार्थी सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. या पदावर असतानाही अनेक चळवळी त्यांनी उभ्या केल्या होत्या. मनसेच्या पक्ष नेतृत्वाखाली लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकीत पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रत्यक्ष काम केले आहे. जळकोट येथील ग्रामदैवत श्री .केदार लिंग देवस्थानच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष असताना यात्रेचे उत्कृष्ट नियोजन त्यांनी केले होते.
मल्लिकार्जुन कुंभार यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षनेतृत्वाने त्यांना तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. पक्षाच्या एका बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी निवड जाहीर केली आहे. या निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. मल्लिकार्जुन कुंभार यांचे जळकोट येथील केदारलिंग देवस्थान ट्रस्ट, यात्रा महोत्सव कमिटी व राजे शिवछत्रपती सार्वजनिक जन्मोत्सव समिती यांच्यासह प्रसाद हत्ते, प्रवीण नरुणे, विजय पिसे, अविनाश डांगे, आतिश मेंगले, अमोल आलुरे, प्रवीण मेंगशेट्टी, शिवा कुंभार, महेश छत्रे, सदाशिव हासुरे, शिवा नाटेकरी, अजय कुंभार, तुकाराम कुंभार, संजय कुंभार, सचिन कुंभार, तम्मा कुंभार, भैया किलजे, सचिन कदम, ब्रह्मानंद कदम, श्रीकांत कदम, उमेश गंगणे,डॉ. संजय कदम, गणेश मोटे, सिद्धनाथ सावंत, अमित खारे, विनोद सावंत, अविनाश कांबळे, अंकुश सुतार, सुरेश गुरव, गोविंद सोनटक्के, राहुल चौधरी, विजय सगर, राहुल कदम आदी सामाजिक कार्यकर्ते, युवक, पक्ष पदाधिकारी, मित्रपरिवार ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.