उस्मानाबाद, दि. 16 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांची जिल्हा नियोजन समिती लातूर येथे बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. तसेच त्यांच्या जागी लातुरचे श्रीकांत कुन्टला यांनी पदभार स्विकारला.
यावेळी निरोप व स्वागत समारंभ प्रसंगी उस्मानाबादचे जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यानी सत्कार केला. याप्रसंगी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती प्रीतम कुण्टला, रूकमे, एनआयसी अधिकारी विजय पाटील, अमोल वडगणे, ठाकुर, डोके, पंकज पाटील, बागल, सानप आदीजण उपस्थित होते.