आलुर, दि. 16 :

मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक पातळीवर यासाठी सॅनिटरी पॅड उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून अस्मिता प्लस योजना आली असून यामुळे खऱ्या अर्थाने महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे, असे मत अनेक मान्यवरांनी आलुर ता. उमरगा येथे व्यक्त केले.

उमेद अभियान जिल्हा परिषद उस्मानाबाद मार्फत दिनांक 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये मासिक पाळीबद्दल व्यापक जनजागृती व्हावी आणि अस्मिता सॅनिटरी प्लस ची माहिती तालुक्यातील प्रत्येक गावात व्हावी यासाठी जागर अस्मितेचा या मोहिमेचे आलुर ता. उमरगा आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेद समुहाचे तालुका कृषी व्यवस्थापक विवेकानंद पवार, प्रभाग कृषी व्यवस्थापक संतोष राठोड, उमरगा पंचायत समिती सदस्या सौ. विमलताई राठोड, आलुरचे सरपंच सुरेश बोलदे, माजी उपसरपंच राजकुमार माने, उमेद गटाचे कृषी सखी सौ. मालाश्री बगले यांच्यासह सर्व सी.आरपी., गावातील महिला व किशोरवयीन मुली उपस्थित होते.

ग्रामविकास विभाग अंतर्गत उमेद अभियान मार्फत उमरगा तालुक्यात आलुर येथये 86 गटांची स्थापना झालेला  असून सदर महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी या या माध्यमातून सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जाणार आहेत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींना स्मार्ट कार्डच्या माध्यमातून फक्त पाच रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे.. याचा शुभारंभ आज करण्यात आला.

पुढील पंधरा दिवसांमध्ये गाव पातळीवर ती विविध कार्यक्रम राबवून प्रत्येक कुटुंबापर्यंत मासिक पाळी व्यवस्थापन आणि त्याबद्दल व्यापक जनजागृती केली जाणार आहे असे तालुका व्यवस्थापक यांनी सांगितले सदरहू कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेद अभियानातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती तालुका अभियान कक्षातील सर्व स्टाफ आणि पंचायत समिती व विविध शासकीय विभाग परिश्रम करत आहेत.


 
Top