अणदूर, दि. 16 : "गुणवत्तेबरोबरच दर्जेदार संस्काराचे धडे विद्यार्थ्यांना देणे गरजेचे असून स्पर्धेच्या युगात अणदूर सारख्या ठिकाणी निस्वार्थ भावनेने शाळा चालवणे ही साधी सोपी गोष्ट नसून भविष्य काळात श्री श्री रविशंकर शाळेला आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.

अणदूर ता. तुळजापूर येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिरातील, पहिल्या बॅच च्या इयत्ता 10 वि परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर हे उपस्थित होते. कोरोना साथीचे सर्व नियम पाळून, सोशल डिस्टन्स राखून अगदी छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, जि. प.सदस्य बाबुराव चव्हाण हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार कैलास पाटील, माजी जि. प.सदस्य दीपक आलूरे, बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक रामचंद्र आलूरे, शिवसेना तालुका प्रमुख जगगनाथ गवळी, माजी तालुका प्रमुख बाळकृष्ण घोडके, संस्थेचे अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.



पुढे बोलताना खासदार ओमराजे म्हणाले की 'गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी ही शाळा भविष्यात फार मोठी शैक्षणिक संस्था होणार असून, त्याची चुणूक 10 वीच्या, या पहिल्या बॅच ने घवघवीत यश संपादन करूनने दाखवून दिली आहे,की या संस्थेचा भविष्यकाळ उज्वल आहे, सध्याच्या काळात विना अनुदानित शाळा चालवणे खूप अवघड गोष्ट असून ,डॉ जितेंद्र कानडे यांच्या संघर्षातून ही शाळा आज यशाच्या शिखरावर पोचली आहे ,ग्रामीण भागातील विद्यार्थी, या शाळेतून शिकून मोठ्या पदावर निश्चित काम करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे म्हणाले की, 2009 ला सुरुवात केलेली ही शाळा आज स्वतःच्या भव्य इमारतीत चालू झाली असून विद्यार्थ्यांना ज्ञानl सोबत संस्काराचे धडे दिले जातात,ही शाळेची 10 वि ची पहिली बॅच होती त्यामध्ये एकूण 23 विध्यार्थी होते त्यातील पहिला विध्यार्थी हा 99.80 टक्के चा तर शेवटचा विद्यार्थी हा 80 टक्के चा आहे शाळेचा निकाल हा 100 टक्के लागला असून, त्या मध्ये विध्यार्थी व शिक्षकाचे परिश्रम लाख मोलाचे आहेत .

यावेळी 23 विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच त्यांना शिकवलेल्या शिक्षकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, या वेळी पालक प्रतिनिधी म्हणून सिद्राम साखरे व विध्यार्थी प्रतिनिधी म्हणून सुयश राठोड यांनी आपले विचार व्यक्त केले या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते कोरोना काळात अणदूर मध्ये मोलाची कामगिरी करणारे बालाजी मोकाशे, देविदास चव्हाण, विलास कोल्हे, जावेद शेख यांचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी जि प सदस्य बाबुराव चव्हाण यांनीआपले विचार व्यक्त करून  अध्यक्षीय समारोप केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  भुजबळ यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण नरे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ नागनाथ कुंभार, डॉ राजकुमार कानडे, प्रशांत मिटकर, मधुकर बंदपट्टे, कांताबाई कानडे, डॉ विवेक बिराजदार आदी मान्यवरांसह पत्रकार, शिक्षक, पालक, उपस्थित होते


 
Top