नळदुर्ग, दि. 18 : आज रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी तामलवाडी ता. तुळजापुर येथून अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्याला सुरुवात केली.
तामलवाडी येथे अतीवृष्टीमूळे अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पुर्ण पिक वाहून गेल्यासारखी स्थिती आहे. गावकरी स्वतः संकटात असूनही अतिशय धीरोदात्तपणे ते परिस्थितीला सामोरे जात आहेत. सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी सरपंच दत्तात्रय वडणे, ज्ञानेश्वर माळी, सुधीर पाटील, अप्पुराजे गवळी, अविनाश गायकवाड, कृष्णा घोटकर, नामदेव सुरवसे, ज्ञानेश्वर जगताप, शिवाजी पाटील, नागनाथ पाटील, भास्कर पाटील, निलेश चिवरे, बाळासाहेब गायकवाड, शहाजी लोंढे आदीसह शेतकरी बांधव उपस्थित होते.