किलज, दि. 17 : तुळजापूर तालुक्यातील किलज येथे अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. तसेच गावातील घरांमध्ये पाणी शिरले. यामध्ये नदीलगत घरे असलेल्या कुटुंबाच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या कुटूंबाना त्यांच्या या कठीण काळात आधार म्हणून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेच्या वतीने या कुटुंबाना किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अभिनेत्री अश्विनीताई महांगडे उपाध्यक्ष निलेश जगदाळे यांच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे तुळजापूर तालुका सदस्य प्रसाद राजमाने, राम जळकोटे, अविष्कार फस्के, शुभम नलावडे यांनी या कुटुंबाना मदत केली. त्याचबरोबर या सेवाभावी संस्थेच्या ऑफीसिअल पेज वरून या सदस्यांच्या माध्यमातून सद्य परिस्थिती दाखवण्यात आली. या मदतीचे आपत्तीग्रस्त कुटुंबाने आभार मानले.

 
Top