जळकोट : मेघराज किलजे
तुळजापुर तालुक्यातील आलियाबाद येथे महाराष्ट्र शासन च्या वतीने शेतकऱ्यांना बी- बियाणे मोफत वाटप करण्यात आले.
कृषी विभागाच्या वतीने शासनाकडून २० शेतकऱ्यांना प्रत्येकी २० किलो हरभरा, २५ शेतकऱ्यांना १ पिशवी ज्वारी मोफत वाटप जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी सहायक एस.आर. माने ,शेतकरी पांडुरंग चव्हाण,नेमिनाथ चव्हाण,मनोज चव्हाण, ऋषी चव्हाण ,यशवंत राठोड, माणिक राठोड, देविदास चव्हाण, शंकर राठोड, उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून यावेळी वेळेवर बियाणे मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.