जळकोट : मेघराज किलजे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या किसान काँग्रेस विभागाच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी बोरगाव तुपाचे (ता. तुळजापूर) येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते गौरीशंकर सिद्रामप्पा मुळे यांची नियुक्ती झाली आहे.
किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून मराठवाडा अध्यक्ष ऍड. माधव जाधव यांनी गौरीशंकर मुळे यांची उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांचे काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे व विचार तळागामध्ये पोचविण्यासाठी व घराघरांमध्ये काँग्रेस पक्षाचा विचार पोचविण्यासाठी व देशहित, समाजहित व शेतकरी, शेतमजूर यांच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. असे मुळे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
या निवडीबद्दल उस्मानाबाद जिल्ह्यातून पक्ष पदाधिकारी, नेतेमंडळी व कार्यकर्त्यांमधून गौरीशंकर मुळे यांचे अभिनंदन होत आहे.