चिवरी : राजगुरू साखरे

स्वतःला बुद्धिवादी समजणाऱ्या माणसालादेखील निसर्गाचा नीटसा अंदाज नाही. परंतु पक्ष्यांना मात्र या निसर्गाचा अचूक अंदाज माहीत असावा असे वाटते. यंदाच्या वर्षी जास्त पाऊस काळ असल्याचे पक्ष्यांना ज्ञान होते. त्यामुळे तर विविध जातीच्या पक्षांनी तालुक्यातील धरणाच्या, तलावाच्या, विहिरीच्या, ओढ्याच्या काठी तळ ठोकला होता. तर चिमण्यांनी आणि सुगरण पक्षांनी आपली घरटी विहिरीत डोकावणाऱ्या झाडावर न बांधता ती वादळी वार्याच्या पावसापासून वाचवण्यासाठी उंच झाडाच्या फांदीवर बांधले असावीत.

निसर्गाचा अचूक अंदाज करणे भल्याभल्यांना जमला नाही. हवामान अंदाज सांगणाऱ्याचा देखील अंदाज बऱ्याच अंशी चुकीचा ठरू शकतो. गेल्या अनेक वर्षी पाहायला न मिळालेल्या मान्सूनच्या सरी तुळजापूर तालुक्यात जोरात बरसल्या. याचा बहुतेक अंदाज कितपत  नवाला कोणाला होता माहित नाही , परंतु जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच सर्व पक्षांनी घरटी बांधायला सुरुवात केली होती. वादळ वारा आणि पावसाच्या सरी आणि विहिरी, नद्या ,तलाव,ओढे यांना येणारे पुराचे पाणी यापासून सुरक्षित अशी ही घरटी बांधली. 

इतर वेळी विहिरीच्या आत मध्ये डोकावणाऱ्या झाडावर, तळ्याकाठच्या झाडा झुडपावर बांधली जाणारी घरटी यंदा मात्र उंच झाडाच्या शेंड्यावर सुरक्षित अशा ठिकाणी आपली घरटी बांधलेली दिसून आले. जिथे वादळी वारा, पुराचे पाणी या नैसर्गिक आपत्तीपासून बचावण्यासाठी सुरक्षित अशी घरटी बांधले होते. यावरून असे लक्षात येते की मानवापेक्षा पक्ष्यांना निसर्गाचे अंदाज चांगला येतो. 

चालू वर्षी चिञा नक्षञात तर अतिवृष्टी झाली. त्यामुळे मानवनिर्मित अनेकांचे घरे वादळ वारा व पावसाने पडली, अनेक जनावरे मरण पावली तर शेतीचे तर अतोनात नुकसान झाले. मात्र अशा परिस्थितीत देखील  पक्ष्यांनी जून महिन्यात बांधलेले घरटी आज देखील सुस्थितीत आहेत. त्यामुळे मानवाने निसर्गाचा अंदाज घ्यायचा असेल तर प्राणी व पक्षांच्या हालचालींवर नजर ठेवायला हवे, असे वाटते.

 
Top