उस्मानाबाद, दि. २३ :

संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. मात्र आता सदरील दर रविवारचा जनता कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे. याबाबत उस्मानाबाद निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , शिवकुमार स्वामी यांनी सदरील आदेश पत्रक काढले आहे. 

आदेश पत्रक

ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाचे संदीय क्र .1 च्या आदेशाचे अनुभगाने संदर्भ . 2 मध्ये नमूह या कार्यालयाचे आदेशान्वये उस्मानाबाद जिल्ह्यात लाँकडाऊनचा कालावधी 2. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला असून लाँकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत .. ज्याअर्थी संदर्भाय क 2 घ्या आदेशा परिशिष्ट 2 मधील मुख क . 4 ( ) मध्ये दर रविवारी जनता कर्फ्यु राहील असे नमूद केलेले आहे . ज्याअर्थी संदर्भ क्र . 3 मध्ये नमूह विनंतीये अनुशंगाने संदर्भ क्र . 2 घ्या आदेशात अंशत : दुरुस्ती करणेबाबत मा . जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , उस्मानाबाद यांनी निर्देश दिले आहेत . त्या अर्थीय संदर्भ क्र . 2 च्या आदेशातील परिशिष्ट 2 मधील मुद्दा क्र . 4 ( 8 ) मध्ये नमूद केलेले दर रविवारी जनता कर्फ्यु राहील हे वाक्य याद्वारे वगळण्यात येत असून यापुढे रविवारचा जनता कर्फ्यु चा आदेशाद्वारे मागे घेण्यात येत आहे . सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 23.10.2020 पासून लागू करण्यात येत आहे . (  जिल्हाधिकारी यांचे निर्देशांनुसार )असे आदेश पत्रकात नमुद केले आहे.

 
Top