उस्मानाबाद - आंध्र प्रदेश सरकारने महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने दिशा हा कायदा लागू केलेला आहे. दिशा कायद्यानुसार पिडीतांना लवकर न्याय मिळणार आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील दिशा कायदा लवकरात लवकर लागू करून महिलांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही याची हमी देण्याची मागणी उस्मानाबाद जिजाऊ ब्रिगेडची जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे केली आहे.
जिजाऊ ब्रिगेड जिल्हा पदाधिका-यानी निवेदनात पुढे म्हटले आहे की, दिवसें दिवस महिलांवरील अत्याचा-याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे जन्मलेल्या मुलींचे देखील भविष्य सुरक्षित राहिलेले नाही. ही पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबाला अन्याय होऊन देखील न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागते आणि न्यायालयात आपली पावले झिजवावी लागतात. त्यामुळे समाजात महिलांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. . निवेदन देतांना उस्मानाबाद जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष किरण निंबाळकर, बाबई चव्हाण, मीना सोमाणी,रुपाली घाडगे,आशा लांडगे इत्यादी उपस्थित होते.