उस्मानाबाद, दि. 18 : राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण राज्य सरकार मदत देण्यास तयार आहे. परंतु यामध्ये केंद्र सरकारने हि मदत देणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील अतिवृष्टी भागातील सर्व खासदार समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज नुकसानग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाहणी दौ-यादरम्यान सांगितले.

काक्रंबा ता. तुळजापूर व सास्तुर ता. लोहारा या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची खासदार शरद पवार यांनी आज रविवार पाहणी केली. यावेळी खा. पवार यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधुन धिर दिला. किल्लारी सारख्या महाभयंकर भूकंपावर माता करून उभा राहायलो आहोत. या आस्मानी संकटावर हि आपण माता करू शेतकरी बांधवांनी धीर धरावा, तसेच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ऊस, सोयाबिन, तूर, मका, उडीद, फळबागांचे खूप मोठे प्रमाणात नुकसान झालेले आहे. ऊस क्षेत्राचे नुकसान झाले यासंदर्भात साखर कारखाने लवकर चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब, आ. ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जिवन गोरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, संजय निंबाळकर, प्रतापसिंह पाटील, सक्षणा सलगर, महेंद्र धुरगुडे यांच्यासह महाविकासआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top